मुंबई । गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारनं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. ती म्हणजे वीजेच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नवे वीज दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. या निर्णयामुळे वीज दरात 10 टक्के कपात होणार असून यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. घरगुती वीज वापरकर्त्यांना वीज दर कपातीमुळे दिलासा मिळणार आहे. याचा उद्योग क्षेत्राला देखील फायदा होणार आहे.
महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दर कपात करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. महावितरण कंपनीने सादर केलेल्या या प्रस्तावावर सुणावणी झाल्यावर आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश दिले आहेत.महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून मध्यरात्री उशिरा नवे दर जाहीर करण्यात आले आहेत.
उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यात वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. एका ठरावीक युनिटपेक्षा जास्त वीज खर्च झाल्यास त्याचा मोठा फटका हा सर्वसामान्य लोकांना बसतो. सध्याच्या दरानुसार घरगुती वीजबिल देखील हजारो रुपयांच्या घरात येतं. वजीबिलापोटी हजारो रुपये भरावे लागतात. मात्र आता नव्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वीज दरामध्ये कपात करण्यात आली आहे.
Discussion about this post