नाशिक । नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातील मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून घरी परतत असताना इर्टीका कार शेतातील विहिरीत कोसळल्याने एकाच कुटुंबातील तब्बल 9 जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (3 एप्रिल) रात्री घडली. या दुर्घटनेत 6 विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरातील एका मंगल कार्यालयात खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर इंदोरे (ता. दिंडोरी) येथील दरगुडे कुटुंबीय कारने घरी परतत होते. मात्र, मंगल कार्यालयाजवळील शेतात असलेल्या उघड्या विहिरीत कार अचानक कोसळली. घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले; मात्र सर्व 9 जणांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेनंतर प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. या घटनेनंतर संबंधित विहीर मालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे दिंडोरी तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.















Discussion about this post