आखाती देशामधील युद्धाचा आग काही कमी होताना दिसत नसून दिवासेंदिवस अजून भीषण होत चालली आहे. सुरुवातीला परस्परांच्या लष्करी तळांवर हल्ले केले. आता ही लढाई ऊर्जा ठिकाणांवर हल्ल्या करण्यामध्ये बदलू लागली आहे. काल इस्रायलने इराणच्या साऊथ पार्स गॅस फिल्डवर हल्ले केले. अमेरिका-इस्रायलने पहिल्यांदा इराणच्या नैसर्गिक वायूच्या ठिकाणांवर हल्ला केला आहे.
हल्ल्यामुळे भडकलेल्या इराणने सौदी अरेबिया, कतर आणि यूएईच्या तेल व गॅस ठिकाणांना टार्गेट करण्याची धमकी दिली होती. त्यानुसार इराणने कतर आणि सौदी अरेबियाच्या गॅस प्रकल्पांवर हल्ले केले आहेत. परिणामी जगभरात गॅस तुटवड्याच संकट अजून गंभीर होऊ शकतो.
इराणने कतरच्या गॅस प्रकल्पावर हल्ला केला आहे. भारताचा 47 टक्के एलपीजी कतरच्या गॅस प्रकल्पातून येतो. हा भारतासाठी मोठा झटका आहे. तिथे उत्पादन कमी झाल्यास भारताला याची झळ बसू शकते.
इस्रायलने इराणच्या गॅस प्रकल्पावर केलेला हल्ला आणि इराणने दिलेलं प्रत्युत्तर याचा भारतीय शेअर बाजारात लगेच परिणाम दिसून आलाय. भारतीय शेअर बाजाराला याचा मोठा फटका बसला आहे. मागच्या तीन दिवसांपासून शेअर बाजारात सुरु असलेल्या तेजीला ब्रेक लागला आहे. मिडिल-ईस्टमध्ये सुरु असलेलं युद्ध आता तेल युद्धामध्ये बदलू लागलं आहे















Discussion about this post