Wednesday, August 6, 2025
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

युवकांसाठी जयहिंद लोकचळवळ हे मोठे व्यासपीठ; आमदार सत्यजित तांबे

गांधी नेहरूंच्या विचारावर देश उभा; महात्मा गांधी व छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकच विचार

जनबंधू लाईव्ह न्यूज टीम by जनबंधू लाईव्ह न्यूज टीम
October 6, 2024
in जळगाव जिल्हा
0
युवकांसाठी जयहिंद लोकचळवळ हे मोठे व्यासपीठ; आमदार सत्यजित तांबे
बातमी शेअर करा..!

जळगाव | 
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा विचार निर्भयता आणि नैतिकता शिकवतो. हा विचार घेऊन युवकांनी राष्ट्रबांधणीसाठी काम करावे. गांधी आणि नेहरूंच्या विचारावर देश उभा आहे . हा विचार जोपासणारी जयहिंद लोकचळवळ ही राज्यभरातील तरुणांसाठी मोठे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन युवक आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.

जैन हिल येथील गांधी तीर्थ येथे जयहिंद लोकचळवळ व गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचव्या जयहिंद ग्लोबल कॉन्फरन्सच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर इंडोनेशियाचे गांधीवादी विचारवंत पद्मश्री इंद्रा उदयन, संस्थापक अध्यक्ष मा. आमदार डॉ.सुधीर तांबे ,सचिन इटकर, संकेत मुनोत, गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन ,डॉ. आश्विन झाला , डॉ रवींद्र वानखेडे, सौ दुर्गाताई तांबे, शैलेंद्र खडके आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, सुदृढ निरोगी समाज बनवण्यासाठी 1998 मध्ये जय हिंद लोकचळवळीची स्थापना झाली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात ,राज्याचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे यांनी माणसांना जोडण्याचे संस्कार दिले यातून मी युवकांना जोडत गेलो. आणि आज ही चळवळ राज्यभर पोहोचली आहे. समाजामध्ये अंधश्रद्धा ,जातीभेद, अस्वच्छता रूढी परंपरा यांचे मोठे प्राबल्य असून या सर्वांच्या विरुद्ध लढण्यासाठी रचनात्मक विचार जय हिंद च्या माध्यमातून दिले जात आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा नैतिकतेचा विचार माणसाला निर्भय बनवतो. गांधी व नेहरूंच्या विचारावर हा देश उभा असून गांधींनी भारताला भारत पण दिले.

छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा स्वराज्य व रयतेच्या कल्याणाचा एकच विचार असून सर्वधर्मसमभाव जोपासत शेतकरी व गोरगरिबांच्या कल्याणाचे राज्य निर्माण व्हावे हा विचार त्यांचा आहे. या विचारातून या तरुणांनी काम असे आव्हान करताना विविध कलागुण व करिअरच्या दृष्टीने राज्यभरातील युवकांसाठी जय हिंद लोकचळवळ हे मोठे आश्वासक व्यासपीठ असल्याचे त्यांनी सांगितले.

तर पद्मश्री इंद्रा उदय म्हणाले की, गांधी विचार सर्व दूर पोहोचवणारी ही जय हिंद लोक चळवळ असून देश प्रेमाने भारवलेले तरुण येथून निर्माण होत आहेत. भारत व इंडोनेशिया मधील संबंध अधिक दृढ करण्याचे काम जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर मा. आमदार डॉ सुधीर तांबे म्हणाले की राज्यघटनेला अपेक्षित निकोप समाज निर्माण व्हावा यासाठी जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून काम होत आहे. सध्या देशामध्ये विषारी वातावरण असून राजकीय नेतृत्व कसे करावे ही गांधीजींच्या विचारातून कळते. हा विचार जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जैन उद्योग समूहाने उभारले गांधी तीर्थ हे सर्वांसाठी ऊर्जा देणारे प्रेरणास्थळ असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रमोद चुंचूवार यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 300 युवक व युवती तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार नाशिक बुलढाणा, अहमदनगर , औरंगाबाद जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चारित्र्यसंपन्न युवक घडवणारी जयहिंद लोकचळवळ -आमदार थोरात

स्वर्गीय भवरलाल जैन यांनी गांधी विचारांचा पाया कायम ठेवून हा जैन उद्योग समूह सुरू केला. त्या माध्यमातून सुरू असलेले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे हे जैन हिल येथील गांधी तीर्थ हे भारतातील अत्यंत सुंदर स्मारक आहे. डॉ सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली युवकांना चारित्र्यसंपन्न घडवणारी जय हिंद लोक चळवळ ही आंतरराष्ट्रीय पातळीवर जाते आहे. याचा आनंद आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून राज्यभरातील अनेक युवक या परिषदेला उपस्थित राहिले गांधी विचार आणि राष्ट्रहिताचा विचार घेऊन हे सर्व युवकांनी काम करावे असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दूर प्रणालीद्वारे सर्वांशी संवाद साधताना व्यक्त केला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मुंबई मेट्रोमध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! तब्बल २००००० रुपये पगार मिळेल; असा करा अर्ज

Next Post

गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूसासह दोघांना अटक

Next Post
गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूसासह दोघांना अटक

गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूसासह दोघांना अटक

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भाजपाच्या प्रवक्त्यांची थेट न्यायाधीश पदावर नेमणूक, रोहित पवारांची सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट

भाजपाच्या प्रवक्त्यांची थेट न्यायाधीश पदावर नेमणूक, रोहित पवारांची सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट

August 5, 2025
राज्यातील 11 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान ; सार्वधिक मतदान नंदुरबार

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयुक्तांची मोठी घोषणा; कधी होणार निवडणुका?

August 5, 2025
उत्तरकाशीतील हर्षिल खोऱ्यात ढगफुटी मोठी दुर्घटना ; पुरात घरं वाहून गेली, थरकाप उडवणारा व्हिडिओ पाहा

उत्तरकाशीतील हर्षिल खोऱ्यात ढगफुटी मोठी दुर्घटना ; पुरात घरं वाहून गेली, थरकाप उडवणारा व्हिडिओ पाहा

August 5, 2025
शेतकऱ्यांनो! दुकानात बियाणे खरेदीला जाताना ‘ही’ गोष्ट लक्षात ठेवा

शेतकऱ्यांसाठी देशाबाहेरील अभ्यासदौऱ्यांची योजना; अर्ज प्रक्रिया सुरू

August 5, 2025

Recent News

भाजपाच्या प्रवक्त्यांची थेट न्यायाधीश पदावर नेमणूक, रोहित पवारांची सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट

भाजपाच्या प्रवक्त्यांची थेट न्यायाधीश पदावर नेमणूक, रोहित पवारांची सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट

August 5, 2025
राज्यातील 11 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान ; सार्वधिक मतदान नंदुरबार

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयुक्तांची मोठी घोषणा; कधी होणार निवडणुका?

August 5, 2025
उत्तरकाशीतील हर्षिल खोऱ्यात ढगफुटी मोठी दुर्घटना ; पुरात घरं वाहून गेली, थरकाप उडवणारा व्हिडिओ पाहा

उत्तरकाशीतील हर्षिल खोऱ्यात ढगफुटी मोठी दुर्घटना ; पुरात घरं वाहून गेली, थरकाप उडवणारा व्हिडिओ पाहा

August 5, 2025
शेतकऱ्यांनो! दुकानात बियाणे खरेदीला जाताना ‘ही’ गोष्ट लक्षात ठेवा

शेतकऱ्यांसाठी देशाबाहेरील अभ्यासदौऱ्यांची योजना; अर्ज प्रक्रिया सुरू

August 5, 2025
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914