हिंगोली ! रस्त्ये अपघाताचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढत असून अशातच भीषण अपघात झाल्याची एक बातमी समोर आलीय. दोन ट्रकच्या समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार तर दीडशे मेंढ्या ठार झाल्याची घटना आज (ता. २५) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हिंगोलीत कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावर माळेगाव फाट्याजवळ घडलीय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान येथील एक ट्रक (एचआर- ५५-एजे-३१११ ) २०० मेंढ्यांना घेऊन हैदराबादकडे निघाला होता. या ट्रकमध्ये ट्रकचालकासह चौघेजण केबिन मध्ये बसले होते. तर, एक व्यक्ती पाठीमागे मेंढयांसोबत बसला होता. हा ट्रक माळेगाव फाट्याजवळ आला असताना उड्डाणपुलाखाली ट्रक चालकाला डूलकी लागली. अशात हा ट्रक समोर उभा असलेल्या ट्रकवर आदळला.
या अपघातामध्ये ट्रकमधील तिघेजण जागीच ठार झाले. तर, दोन जण गंभीर जखमी झाले होते. नंतर रुग्णालयात नेत असतानाच त्यांचाही मृत्यू झाला. तसेच, दीडशे मेंढ्या दगावल्या.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातातील दोन्ही जखमींना उपचारासाठी कळमनुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले.















Discussion about this post