अहिल्यानगर : महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे दोन उमेदवार गेल्या 24 तासांपासून बेपत्ता झाले आहेत. या उमेदवारांचा त्यांच्या कुटुंबीयांशी किंवा पक्षाशी कोणताही संपर्क झालेला नाही, त्यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
दोन उमेदवार गायब झालेल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांनी दिलीय. दरम्यान केडगाव भाग हा संवेदनशील असल्याने निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोन उमेदवारांचे अपहरण केले असावे असा संशय विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी व्यक्त केलाय.
राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग असे गायब झालेल्या उमेदवारांची नावे आहेत. याप्रकरणी मनसेचे पदाधिकारी तक्रार दाखल करण्यासाठी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेत. पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली तपासाची मागणी केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार,दोन उमेदवारांपैकी एक उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि दुसरा उमेदवार अजित पवार गटाच्या उमेदवाराविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणता होते.















Discussion about this post