मुंबई । जुलै महिन्याला सुरूवात झाली आहे.दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक बदल होत असतात. त्याच नुसार या महिन्यात देखील काही गोष्टींमध्ये मोठे बदल झाले आहेत. ज्यात सामान्य माणसाच्या जीवनावर याचा परिणाम होणारे. हे बदल नेमके कोणते आहेत, त्याबाबत आज सविस्तर जाणून घेऊ.
सिमकार्ड पोर्ट कालावधी
सिमकार्ड पोर्ट करण्याचा कालावधी कमी करण्यात आला आहे. या आधी ग्राहकांना सिमकार्ड पोर्ट करण्यासाठी तब्बल १० दिवसांचा कालावधी लागत होता. मात्र आता सिमकार्ड पोर्ट करून हवे असेल तर फक्त सात दिवसांचा कालावधी लागणार आहे.
काहीवेळा फोन चोरी होतो तेव्हा आपण ते सिम बंद करून दुसरं सिम खरेदी करतो. तर नव्या नियमानुसार तुम्हाला आता नवीन सिम खरेदीसाठी ७ दिवस वाट पहावी लागणार आहे. वाढत असलेल्या चोरींच्या घटनांमुळे TRAI ने हा निर्णय घेतला आहे.
रिचार्जचे पैसे वाढणार
रिचार्जच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. १ जुलैपासून तुम्हाला फोनमध्ये रिचार्ज करताना खिशाला पिळा खालावा लागणार आहे. रिलायन्स, जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलने या कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या दरांमध्ये मोठी वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशावर याचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.
गॅस सिलिंडर
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोलियम कंपन्या LPG सिलिंडर आणि एटीएफच्या किमतीत बदल करतात. त्यात बजेटमध्ये वर्षाला तीन सिलिंडर फ्री देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे १ जुलैपासून तुम्हाला गॅस सिलिंडरवरही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
क्रेडिट कार्ड
क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तुम्ही देखील क्रेडिट कार्ड वापरत असाल तर येथून पुढे भारत बिल पेमेंट सिस्टमद्वारे क्रेडिट कार्ड पेमेंटची प्रक्रिया करावी लागेल. सर्व बँकांना याबाबत आदेश देण्यात आले आहेत.















Discussion about this post