मुंबई । राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने आज सकाळी राज्यात मोठी कारवाई केली पुण्यासह ४१ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छापेमारी दरम्यान १० दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे पकडलेले दहशतवादी देशभरात अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहितीही समोर आली आहे. त्यांच्याकडून बॉम्ब बाल्स्टचे साहित्यही राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने जप्त केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवारी( ९ डिसेंबर) राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) राज्यात संयुक्तपणे कारवाई करत १० दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. आज पहाटेपासून ही कारवाई सुरू होती. गुप्तचर विभागाकडून कर्नाटकातील १, पुण्यात २, ठाणे ग्रामीणमध्ये ३१, ठाणे शहरात ९ आणि भाईंदरमध्ये १ ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
या कारवाईत भिवंडीच्या पडघा गावातून एनआयएने महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने एनआयएने ७ ते ८ लोकांना ताब्यात घेतले आहे. पुण्यामधून दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गाव हे एनआयएच्या रडारवर होतं. तसेच पुणे आणि इतर ठिकाणीही सुरक्षा यंत्रणांची छापेमारी सुरू आहे.दरम्यान, याआधी पुण्यात सापडलेल्या दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गावातून दोन ते तीन जणांना करण्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. s)
Discussion about this post